Skip to content
Home » गुरु परिवर्तन – वृश्चिक रास

गुरु परिवर्तन – वृश्चिक रास

भाग्यातून लाभाची प्राप्ती
व्यक्तिमत्त्वात येईल समृद्धी

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर तुळ राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
राशीचक्रातील धनु आणि मीन या दोन राशीचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. धनु ही त्यांची अग्नीतत्त्वाची रास तर मीन ही त्यांची जलतत्त्वाची रास आहे. गुरु महाराजांचे मित्र ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र व मंगळ होय. बुध आणि शुक्र हे त्यांचे शत्रु ग्रह आहेत. शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य तर गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. त्यांच्यामुळे त्यांच्या एक नैसर्गिक शत्रुत्व येथे निर्माण होतं. शनि हा ग्रह मात्र त्यांचा सम ग्रह आहे. आता सम असणे म्हणजे काय असतं? तर ती वन वे मैत्री असते. अर्थात शनि गुरुला आपला मित्र मानतो तर गुरु शनिला शत्रु मानतो. त्यामुळे त्यांच्यात समत्वाचं नातं तयार होतं. त्यांच्यात फार मैत्रीही नसते आणि फार शत्रुत्वही नसतं. अशी सर्व परिस्थिती असतांना गुरु महाराज कर्क राशीत उच्चीचे होतात. तिथे ते ०५ अंशापर्यंत उच्चीचे होतात तर मकर राशीत ०५ अंशापर्यंत ते परम नीचीचे होतात. मकर ही त्यांची नीच रास आहे. आता ते २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजे ते तुमच्या अष्टम स्थानातून भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा तुळ राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
तुळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज पत्रिकेतील तृतीय आणि षष्ठ या दोन स्थानांचे स्वामी आहेत. ही दोन्ही स्थानं उपयच स्थान म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गुरु महाराज तुळ राशीसाठी कारक ग्रह होत नाहीत. तसंही तुळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य तर गुरु ग्रह म्हणजे देव गुरु बृहस्पती होय. अर्थात त्यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे तुळ राशीसाठी गुरु महाराज फार लाभदायक ठरत नाहीत. तरी ते दाता म्हणजे देणारे आहेत व नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. त्यांच्या त्या नैसर्गिक कारकत्वाला अनुसरुन शत्रु ग्रहाची रास असली तरी काही बाबतीत ते शुभ प्रभाव नक्कीच देत असतात. त्यात मुख्यत: प्रवासाचे अनके योग निर्माण करणं, परिश्रम करण्याची मानसिकता तयार करणं अशी शुभ फळे तुम्हाला त्यांच्यापासून प्राप्त होतील. किंबहूना तुळ पत्रिकेत नोकरी हा विषय देखील गुरु महाराजांकडे येतो. कारण ते तुमच्या षष्ठ स्थानाचे स्वामी आहेत. म्हणजे परिश्रम, पराक्रम, प्रवास, नोकरी, कर्ज, न्यायालयीन कामं या सर्व गोष्टी तुळ पत्रिकेत गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात. असे हे गुरु महाराज गेली काही महिने तुमच्यासाठी चौथे होते. म्हणजे ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान होते. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत. चतुर्थ स्थानातील गुरु महाराजांकडून तुम्हाला फारसे शुभ परिणाम मिळालेले नाहीत. शिवाय ते तुमच्या पत्रिकेला कारकही नाहीत. मात्र आता ते तुमच्या पंचम स्थानात जाणार असल्यामुळे त्याची काही शुभ फळं तुम्हाला निश्चितच प्राप्त होतील.
आपण आधीही समजून घेतलं आहे की गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृततुल्य मानलं जातं. कारण ते जिथं विराजामान असतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांची दृष्टी पडते तेथील फळांमध्ये ते वृद्धी करीत असतात. त्यानुसार पंचम स्थानापेक्षा त्यांची दृष्टी ज्या स्थानावर पडत आहे, तेथील शुभ फळे तुळ जातकांना अधिक प्रमाणात प्राप्त होतील. सोबतच पत्रिकेतील पंचम स्थान हे धर्म त्रिकोणाच्या स्थानांपैकी एक आहे. या स्थानात येणारे गुरु महाराज हे एकटेच धर्म त्रिकोण पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. कारण ते जिथे विराजमान होतात तेथून त्यांची पंचम, सप्तम व नवम दृष्टी असते. त्यामुळे त्यांच्या एका स्थानात विराजमान होण्यानेच ते एक त्रिकोण पूर्ण होतो. ही गुरु महाराजांची शक्ती, क्षमता आहे, असे आपण म्हणू शकतो. त्यानुसार तुमच्या पंचम स्थानात विराजमान होऊ ते आपल्या दृष्टीद्वारे धर्म त्रिकोण पूर्ण करणार आहेत. त्याचा एक शुभ प्रभाव तुमच्यावर नक्कीच पडेल.
पंचम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडणार आहे. या अमृत दृष्टीमुळे तुमच्या भाग्यात भरभरुन वाढ घडून येईल. प्रत्येक कार्यात तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होईल. मागील वर्षात तुम्हाला भाग्याने फारसं सहकार्य केलेलं नव्हतं. आपल्या कर्माच्या, परिश्रमाच्या बळावरच सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त कराव्या लागत होत्या. मात्र या काळात गुरु महाराज तुमच्या भाग्यात वृद्धी घडवून आणणार आहेत. सोबतच या काळात वडीलांसोबतचे तुमचे नाते अधिक समृद्ध होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन तुम्ही जबाबदारी घेऊन शकता. तसेच आपल्या कौशल्याद्वारे ती जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण देखील करु शकता. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा असेल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.
यानंतर पंचम स्थानातून गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील लाभ स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तुमच्या मनात ज्या विविध इच्छा असतील किंवा गेली अनेक दिवस तुम्ही मनातील जी इच्छा तुम्ही कुणाला सांगितली देखील नसेल परंतु शुभ काळाची वाट बघत असाल की योग्य काळ आला की हे करुया. तर अशा सर्व इच्छा पूर्ण करण्याचा हा कालखंड आहे. मग ती इच्छा वास्तु संदर्भात असू शकते, वाहनाच्या संदर्भात असू शकते, संततीच्या संदर्भात, विवाहाच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात अशी कोणीतीही इच्छा असू शकते की जी गेली अनेक दिवस तुमच्या मनात घर करुन बसली होती. त्या सर्व इच्छांच्या पूर्तीचा हा कालखंड आहे. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही आपले प्रयत्न वाढवायला हवेत. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे प्रथम स्थानावर पडणार आहे. राशीवर पडणारी गुरु महाराजांची अमृततुल्य दृष्टी ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण पत्रिकेतील प्रथम स्थानावरुन व्यक्तिमत्त्वाचा बोध होत असतो. सोबतच आरोग्य, स्वभाव, ज्ञान, आयुष्यातील बरीच सुख-दु:ख अशा अनेक गोष्टी आपण या स्थानावरुन बघत असतो. गुरु महाराज हे ज्ञानाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे ते जेव्हा तुमच्या राशीवर दृष्टी टाकतात तेव्हा तुमच्या ज्ञानात भर पडत असते. थोडक्यात या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होणार आहे. त्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा.
एकंदरीतच गुरु महाराज पंचम स्थानात विराजमान होऊन एकाचवेळी भाग्य, लाभ आणि तुमची राशी अशा तीन स्थानांवर आपली अमृततुल्य दृष्टी टाकत आहेत. तसेच तृतीय आणि षष्ठ या दोन स्थानांचे ते स्वामी असून तुमच्या पंचम स्थानात ते विराजमान असणार आहेत. म्हणजे पत्रिकेतील एकूण बारा स्थानांपैकी सहा स्थानांवर त्यांचा विशेष प्रभाव पडणार आहे. हा प्रभाव सहा महिन्यांसाठी असेल. त्यानंतर पुन्हा एकदा ते राशी परिवर्तन करतील. तेथून पुन्हा त्यांच्या परिणामांची दिशा ही बदलणार आहे.
थोडक्यात गुरु महाराजांच्या गोचर हा सहा महिन्यांच्या कालखंड तुळ जातकांसाठी विविध दृष्टीने बर्‍यापैकी लाभदायक म्हणता येईल. कारण ते तुमच्या त्रिकोण स्थानात प्रवेश करणार आहेत. त्याचा परिणाम म्हणजे या काळात आर्थिक, कौटुंबिक प्रगती करण्याचा संधी तुम्हाला प्राप्त होतील. कारण गुरु महाराजांसारख्या शुभ ग्रहाची एकाच वेळी जेव्हा भाग्य आणि लाभ स्थानावर दृष्टी पडते तेव्हा भाग्याने लाभ आणि लाभाने भाग्य या गोष्टी जुळून येतात. त्याचा अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा. धन्यवाद! शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८